•  23 May 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

मी अनुभवलेला महाकुंभ लेखन स्पर्धा - बक्षीस प्राप्त लेख - महा कुंभ आणि नागरिक जागृती

दीपिका तांबेकर 25 days ago
संकीर्ण  

                                                            प्रथम पारितोषिक विजेती ( गट क्र. 1 ) दीपिका तांबेकर - 

                                            I believe that MahaKumbh is a Maha Yagy of Unity…..

                                                                 :-   Mr. Narendrea Modi(Prime Minister of India)

संपूर्ण जगाचा आध्यात्मिक गुरु समजल्या जाणाऱ्या भारताची सनातन संस्कृती आणि अखंड चालू असलेल्या काही धार्मिक, सामाजिक आणि त्या अनुषंगाने आर्थिक महत्त्व असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सुप्रसिद्ध आयोजनांपैकीच एक म्हणजे कुंभ.. कुंभ, अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे कुंभाचे चार प्रकार मानले जातात. त्यांची चार निश्चित आणि पवित्र स्थाने प्रयागराज, नासिक, हरिद्वार आणि  उज्जैन, यांना एक वेगळे अध्यात्मिक महत्त्व आहे. कुंभ म्हणजे घट. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या अतिशय पवित्र नद्यांचा संगम आणि तेथील अमृत स्नानाचे महत्त्व हे अद्वितीय आहे . त्याचप्रमाणे उज्जैन -क्षिप्रा नदी, हरिद्वार- गंगा नदी, नासिक -गोदावरी नदी इथेही कुंभमेळ्याचे आयोजन होते. कुंभमेळ्याचे वेगळेच महत्व आणि भौगोलिक अधिष्ठान असते आणि त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा हा विशेषच असतो. पण तरीसुद्धा २०२५ मध्ये प्रयागराज येथे  झालेला महा कुंभ हा न भूतो न भविष्यती असा एक आगळावेगळा अनुभव होता. त्यामागील मान्यता आणि सनातनात सत्य समजून घेणाऱ्या जगातील प्रत्येकासाठी कुंभ म्हणजे खरा आस्थेचा विषय. कारण १४४वर्षांनंतर अवकाशातील ग्रहताऱ्यांची विशिष्ट मांडणी त्यानुसार गंगा, यमुना आणि सरस्वती या तीनही पावन नद्यांचे संगम स्थान असणाऱ्या प्रयागराज येथील हा महा कुंभ तसे पाहिले तर सगळ्याच अर्थाने एकमेवाद्वितीय म्हणता येईल. यावर्षीचा प्रयागराज येथे संपन्न झालेला महा कुंभ या सगळ्याच गोष्टींचे मूर्तीमंत प्रतीक होता.

प्रयागराज येथील महाकुंभ सुरू झाला तो १३ जानेवारीला मकर संक्रांतीच्या वेळी. आणि संपला तो महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर २६फेब्रुवारीला. या ४५ दिवसाच्या काळामध्ये ६ शाही स्नानाचे काही महत्त्वाचे योग होते. त्यामुळेच त्या विशिष्ट दिवसांमध्ये लांबून लांबून येणाऱ्या श्रद्धाळू भाविकांची संख्या लक्षणीय होती. आणि महाकुंभ तील प्रत्येक दिवसाचे आपल्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व समजून घेऊन आलेल्या भाविकांची संख्या इतर दिवशी सुद्धा वाखाणण्यासारखीच होती. या निमित्ताने सनातन सत्य स्वीकारणाऱ्या हिंदूंच्या या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाचे तिथे स्वागतच होते.

या महा कुंभाची माहिती साध्या सोप्या शब्दात प्रत्येकापर्यंत पोहोचेल, अशी प्रसिद्ध करण्यात आली होती. देश-विदेशातील बातम्यांमध्ये हा चर्चेचा विषय होता. त्याविषयीचे औत्सुक्य निर्माण झाले होते. शिवाय प्रयागराज इथे कुंभाची चाललेली जय्यत तयारी टप्प्याटप्प्याने पूर्वीपासून लोकांपर्यंत पोहोचली होती. आस्था किंवा औत्सुक्य यापैकी कुठलेही एका निमित्ताने अनेक लोक या संमेलनामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय आणि स्थानिक शासनाने कसोशीने प्रयत्न करून आयोजनामध्ये कणभरही कमी राहू नये याकरिता शर्थीचे प्रयत्न केले होते. त्याचा प्रत्यय पावलोपावली येत होता. ठीक ठिकाणी पोलिसांची मदत केंद्रे, आरोग्य केंद्रे, अनेक लंगर, निवास केंद्रे, तात्पुरते रस्ते, रोषणाई आणि घाट अशा मूलभूत सोयींनी त्रिवेणी संगमाच्या भोवतालचा परिसर खरोखरच अपूर्व व्यवस्थेने सज्ज होता.  त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा वापर करून, AI चा वापर करून अनेक सोयींचा समावेश केला गेला होता. ड्रोन चा वापर, पाणबुड्यांचा वापर, बोटीनचा वापर तसेच अग्निशमन करण्यासाठी सिद्ध असलेले सर्व उपाय  तिथे  उपलब्ध  करून ठेवले होते. १२पूर्ण कुंभ झाल्यानंतरचा हा महा कुंभ... त्यातही त्रिवेणी संगम मध्ये स्नान, आणि मोक्षप्राप्तीची आस या साऱ्याने प्रयागराज चे संपूर्ण स्थान भारून गेले होते. हा केवळ एक धार्मिक विषय नसून जागतिक आकर्षणाचे बिंदू बनला. म्हणूनच सनातन धर्म आणि त्यातील अक्षय ज्ञान, ऊर्जा आणि पावित्र्य याचा आयुष्यात एकदा तरी अनुभव घ्यावा ह्या भावनेतून संपूर्ण जगातून अनेक भाविकांनी ,याची देही याची डोळा कुंभमेळ्याचे अनुभव घेतले. ज्याप्रमाणे आपल्या देशातील एक विशेष पर्व सम्पूर्ण जगासमोर मांडण्यासाठी शासन जागरूक होते, त्याच प्रमाणे आपल्या समाजाच्या एकत्रीकरणासाठी आपण एकत्र यायला हवे हे जाणणारा जागरूक समाज सुद्धा या निमित्ताने दिसला.

याशिवाय  ४५ दिवसाचा कालावधी  प्रत्येक इच्छुक भाविकाला ‘आपणही हा अनुभव घेऊ शकतो’,  हा आत्मविश्वास देणारा ठरला.  आपल्या आधी जाऊन आलेल्या लोकांचे अनुभव  ऐकल्यानंतर,  ‘आपणही नक्कीच जायला हवं’  असा विचार करून  निघालेल्या  असंख्य भाविकांनी  आपलेही अनुभव  अगदीच  तसेच आहेत  हे  मोठ्या आनंदाने व्यक्त केलं

महाकुंभा मधील अनेक आकर्षणांपैकी एक महत्त्वाचा आकर्षण बिंदू ठरला तो म्हणजे नागा साधू आणि त्यांचे आखाडे!  या नागा साधून बद्दल  आणि त्यांच्या  धर्म रक्षणाच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या. पण प्रसिद्धीपासून फार लांब असलेल्या आपल्याच धर्माच्या खऱ्या लढवय्यांचे दर्शन व्हावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे म्हणून अनेक लोक उत्सुक होते. अघोरी आणि नागा साधू हे वेगळे आहेत हे आजच्या पिढीला कळलं, याचं श्रेय महा कुंभाला जात.

सगळ्यात महत्त्वाचं आणि कठीण असे शिव धनुष्य महा कुंभाने उचलले, आणि ते म्हणजे हिंदूंचे एकत्रीकरण. हिंदू म्हणजे संन्यस्त खड्ग आहेत.  आपला इतिहास आपल्या विभक्त समाजाची वर्तमानातील दुरावस्था सिद्ध करण्याकरता आपल्यासमोरच आहे. पण तरीसुद्धा आपल्याच धर्माबद्दल असलेली उदासीनता किंवा सत्याबद्दलची अनास्था यामुळे तुकड्या तुकड्यात विभागलेला हिंदू समाज देश विदेशातून महा कुंभामध्ये सम्मिलित झाला. अगदी पाकिस्तानातील हिंदू सुद्धा या महा कुंभामध्ये स्नान करण्यासाठी आले होते.

कोणावर कुरघोडी करून स्वतःचे महात्म्य सिद्ध करणारा सनातन धर्म नाही. उलट या सनातन धर्मात असलेल्या मंदिरांचा, परंपरांचा आणि वर्षानुवर्षे समाजाने अव्याहतपणे चालवलेल्या प्रत्येक सणाचा, उत्सवाचा खूप गहन अर्थ असतो, हे या निमित्ताने संपूर्ण जगाने पाहिले आणि नया भारत काय  काय करू शकतो याची झलक दाखवली. एका छोट्याशा शहरामध्ये संपूर्ण जगातून येणाऱ्या असंख्य भाविकांची अत्यंत देखणी सोय भारत करू शकतो, ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. महा कुंभाच्या निमित्ताने समाजामध्ये निर्माण झालेली जागरूकता आणि तर्कशुद्धता आपल्यासाठी आशा  प्रज्वलित  करीत आहेत.

महाकुंभ च्या निमित्ताने प्रयागराज च्या पावन भूमी वरती स्नान करणारे सगळे श्रद्धाळू हे केवळ त्यांच्या श्रद्धेपोटी तिथे आले होते. त्यामध्ये कुठल्याही राज्याच्या, कुठल्याही भाषेच्या आणि कोणत्याही जातीच्या लोकांमध्ये, कोणत्याही प्रकारचे भेद नव्हते. आपण सगळेच समान आहोत आणि एक आहोत ही भावना नकळतपणे आणि खूप प्रभावीपणे प्रत्येकाच्या मनात ठसली. घरी राहूनही प्रसारमाध्यमातून पाहिलेल्या बातम्या, व्हिडिओ या द्वारे आपला सगळा समाज एकत्र आहे, आणि आपणही त्याचा एक अविभाज्य भाग आहोत ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली.

प्रयागराजच्या जवळ असलेल्या बनारस आणि अयोध्या या दोन पावन क्षेत्रांवर आपोआपच भाविकांचे पाय वळले. ५०० वर्षांचा वनवास सहन करून स्वतःच्या हक्काच्या मंदिरात स्थानापन्न झालेला राम लल्ला आणि भविष्यामध्ये आपल्यालाही आपले पूर्वाश्रमीचे सोन्याचे दिवस येतील या आशेत असलेले काशी विश्वनाथाचे मंदिर, अनेकांना अधिकच सशक्त आणि बाणेदारपणे उभे दिसले. कोणीही, कुठलेही आमंत्रण न देता, जगभरातील सजग समाज एकत्रित झाल्याचे संपूर्ण जगातील एवढे मोठे आयोजन आणि संमेलन दुसरे कुठेच नाही. आणि  हीच आपल्या ऐक्याची जागतिक खूण आहे.

महाकुंभामधील अमृत स्नानाचे सौभाग्य लाभलेल्या अनेक हिंदूं पैकी एक म्हणजे मी. घरातील सगळ्यात छोट्या नऊ महिन्याच्या बाळापासून, ६८ वर्षांच्या माझ्या बाबांपर्यंत, आम्ही सगळ्यांनी एकत्रच पुणे ते प्रयागराज, काशी, अयोध्या प्रवास केला. या प्रवासादरम्यान रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमधील भारताची उंच भरारी आम्ही पाहू शकलो. आपल्या देशातील सुशासन करत असलेली कौतुकास्पद कामगिरी अनुभवल्यामुळे हे पुण्य पर्व आमच्या कायमच लक्षात राहील. आपल्या समाजातील नागरिकांमधील जागृती आणि शक्तिप्रदर्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिल्यामुळे आपल्या देशामध्ये अच्छे दिन येतील यात  मात्र शंका नाही.

 

दीपिका  तांबेकर,

पुणे

 

 

 


- दीपिका तांबेकर

  • महाकुंभ आणि नागरिक जागृती -
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

दीपिका तांबेकर

दीपिका तांबेकर

 साहित्य (1), सामाजिक (1), हिंदुत्व (1), माध्यमे (1),

दिनविशेष

trending

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !!

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !! - देवर्षी नारद हे...
विद्याधर ताठे 10 दिवसांपूर्वी

 दिन विशेष
Read more

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.