(बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..)

बांगलादेशात 77 - 78 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. त्याच किंकाळ्या, त्याच अंतःकरण भेदणारे क्रंदन, आसवांनी डबडबलेली तेच डोळे, पाशवी बलात्कारानंतर फेकलेली तीच बिभत्स प्रेते, तीच उद्ध्वस्त-जळकी घरे, तेच मौन, मूकदर्शक बनलेले प्रशासन आणि तेच असहाय हिंदू...!
फाळणीच्या काळातील दृश्य संपूर्ण बांगलादेशात पुन्हा दिसू लागले आहे. बांगलादेशासाठी हे काही नवीन नाही. पश्चिम पाकिस्तानचा हुकूमशहा जनरल टिक्का खान याने १९७१ मध्ये ‘ऑपरेशन सर्चलाइट’राबवून हिंदूंचा नरसंहार सुरू केला. गुरुवार 23 मार्च 1971 रोजी सुरू झालेल्या या आक्रमणात तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील (आता बांगलादेश) 30 लाख हिंदूंची अवघ्या काही महिन्यांत निर्घृण हत्या करण्यात आली. चार लाखांहून अधिक तरुण लेकी-सुनांवर पाशवी बलात्कार करण्यात आले. एवढे करूनही बांगलादेशातील शूर हिंदू आपल्या जिजिविषेने ठाम राहिला. त्याने त्याची मातृभूमी सोडली नाही.
बांगलादेशातील हिंदूंच्या या अदम्य साहसाने संतप्त झालेल्या तेथील अतिरेकी मुस्लिमांनी 5 ऑगस्ट 2024 पासून हिंदूंच्या नरसंहाराची पुनरावृत्ती सुरू केली.
जुलै 2024 मध्ये सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात होते. या चळवळीत अनेक बाह्य शक्तींचा सहभाग होता. परंतु शेख हसीना यांनी राजीनामा देऊन सोमवार, 5 ऑगस्ट रोजी देश सोडून पळ काढताच हे संपूर्ण आंदोलन हिंदू-बौद्ध नागरिकांच्या विरोधात गेले. त्यानंतर चार महिने उलटून गेले असून हिंदूंवरील अत्याचार वाढतच आहेत.
दि. 5 ऑगस्टपासून आजपर्यंत बांगलादेशातील हिंदू रात्री नीट झोपलेले नाहीत. आतापर्यंत हजारो हिंदूंची हत्या झाली आहे. यामध्ये संपूर्ण बांगलादेशातील प्रसिद्ध उद्योगपती, कलाकार, गायक, खेळाडू, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.
खुलना, रंगपूर, राजशाही, बारिसाल, चितगाव, सिल्हेट.... बांगलादेशातील सर्व विभागांमध्ये अजूनही हिंदूंवर हल्ले होत आहेत. मंदिरे पाडणे, मूर्त्या फोडणे ही बाब नित्याचीच झाली आहे. बांगलादेश पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी दुर्गापूजेदरम्यान अतिरेकी मुस्लिमांनी केवळ 35 दुर्गा पूजा मंडप पाडले. परंतु हे आकडे अत्यंत चुकीचे आहेत. बांगलादेशच्या 'जातीय हिंदू महाजोट'च्या (नॅशनल हिंदू अलायन्स) म्हणण्यानुसार, शेकडो दुर्गा पूजा मंडप पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
केवळ 5 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान, 49 हिंदू माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय शिक्षकांना त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. चंदपूर जिल्ह्यातील फरीदगंज गावातील गल्लक आदर्श डिग्री कॉलेजचे प्राचार्य हरिपाद दास यांचा मुस्लिम विद्यार्थ्यांनी अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने अपमान केला. बांगलादेश सरकारने 5 ऑगस्टनंतर एकाच महिन्यात 252 पोलिस अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले. आता बांगलादेशात एकही हिंदू पोलीस अधिकारी नाही..!
एकट्या खुल्ना विभागाचेच उदाहरण घेतले तर तिथे अजूनही हिंदूंवर हिंसाचाराचे तांडव सुरू आहे. खुलना विभागातील जशोर शहराजवळील बेजापारा गावात राहणाऱ्या 200 हिंदू कुटुंबांवर 5 ऑगस्टच्या रात्री मोठा हल्ला झाला. त्यांची घरे लुटण्या आली. आतील जिवंत लोकांसह घरे जाळण्यात आली. महिलांचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी फोनही उचलला नाही. बांगलादेशचे पोलीस हिंदूंवरचा हा भीषण आणि क्रूर हल्ला मूक प्रेक्षक बनून पाहत राहिले.
हिंदूंवरचे हल्ले ६ ऑगस्टलाही सुरूच होते. बागेरहाट सदर उपजिल्ह्यात, तेथील लोकप्रिय सेवानिवृत्त शाळा शिक्षिका मृणाल कांती चॅटर्जी यांना निर्घृणपणे चिरून मारण्यात आले. त्यादिवशी जेसोर शहरात 50 हिंदू घरे लुटली आणि जाळण्यात आली.
किती घटना, किती घटना, किती ठिकाणे... काय काय मोजायचे..?
बागरपारा उपजिल्ह्यातील नरकेलबारिया बाजार, ढालग्राम, मोनिरुपपूर उपजिल्हा, अभयनगर उपजिल्हा, केशबपूर उपजिल्हा, कोयरा उपजिल्हा...
बांगलादेशात जिथे जिथे हिंदू आहेत, तिथे त्यांचा शोधून-शोधून छळ करण्यात आला आहे. त्यांची हत्या केली गेली आहे, त्यांची घरे लुटण्यात आली आहेत आणि तरुण लेकी-सुनांचे अपहरण करण्यात आले आहे.
खुलना विभागातील मेहेरपूर येथे इस्कॉनचे एक खूप मोठे मंदिर होते. त्यात काली मातेची मोठी मूर्ती होती. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्याही मूर्ती होत्या. ते मंदिर पाडण्यात आले. पुतळ्यांची नासधूस करण्यात आली. त्यांच्यावर लघुशंका करण्यात आली...!
या वर्षी दुर्गापूजेपूर्वी, बांगलादेशात सर्व दुर्गा पूजा पंडलांना यावेळी दुर्गापूजा न करण्याचे सांगण्यात आले होते. तरीही हिंमत दाखवून हिंदूंनी जिथे जिथे दुर्गापूजा मंडप उभारले तिथे ते पाडण्यात आले. अनेक ठिकाणी दुर्गामाता आणि कालीमाता यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. राजधानी ढाक्याच्या मध्यभागी असलेल्या चार मंदिरांच्या दुर्गापूजा पंडालमध्ये, दुर्गामातेच्या मूर्तींना दारूने आंघोळ घालण्यात आली, त्यांचे विघटन करण्यात आले आणि त्या तुटलेल्या मूर्तींसमोर बिभत्स नृत्य करण्यात आले.
बांगलादेशातील हिंदूंमध्ये कमालीचे धैर्य आहे. संपूर्ण प्रतिकूलता असूनही, हुकूमशाही सरकारच्या तीव्र विरोधाला न जुमानता, शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी, तिथल्या हिंदूंनी चितगावमधील ऐतिहासिक लालदिघी मैदानावर एक भव्य रॅली काढली. 'सनातन जागरण मंचा'च्या आवाहनानुसार काढण्यात आलेल्या या निषेध रॅलीत लाखो हिंदू जमले होते. त्यांनी मोहम्मद युनूस सरकारला 8 कलमी मागण्यांचे निवेदन दिले.
हिंदूंच्या या निषेधाने बांगलादेश सरकार चक्रावून गेले. त्यांनी इस्कॉनचे मुख्य संत 'चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी' यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. याविरोधात हिंदूंनी निदर्शने केली. त्यामुळे काल शुक्रवारच्या नमाजानंतर अतिरेकी मुस्लिमांनी मोठ्या शहरातील अनेक मंदिरांवर हल्ले करून मंदिरांमध्ये स्थापित केलेल्या देवांच्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या.
बांगलादेश अस्वस्थ आहे. खदखदत आहे. तो अराजकाच्या ताब्यात गेला आहे. तिथे हिंदू सुरक्षित नाही. त्याचे कुटुंब हिसकावले गेले आहे. त्याला रात्री झोप येत नाही. तो आपल्या आयुष्याशी लढतोय, कारण त्याला मातृभूमी सोडायची नाही..!
तुम्हा-आम्हा सर्वांना बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी खडकासारखे उभे राहायचे आहे..!
- प्रशांत पोळ