•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

भारताच्या परम वैभवासाठी समाज संघटन काळाची गरज

विश्व संवाद केंद्र - पुणे 10 days ago
बातम्या  

भारताच्या परम वैभवासाठी समाज संघटन काळाची गरज
मान्यवरांचे प्रतिपादन ; निंबज नगर परिसरात ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात


पुणे, ता. ८ एप्रिल (प्रतिनिधी):
"भारतमातेला पुन्हा एकदा परम वैभवाकडे नेण्यासाठी आणि हिंदू धर्म, संस्कृती व समाजाच्या रक्षणासाठी संघटित शक्ती उभी करणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन मान्यवरांनी येथे व्यक्त केले. सन सिटी रोडवरील निंबज नगर परिसरात आयोजित ‘विराट हिंदू संमेलनात’ ७५० हून अधिक हिंदू बांधव-भगिनींनी राष्ट्रनिर्मितीचा दृढ संकल्प केला.

निंबज नगर परिसर, सन सिटी रोड, आनंदनगर येथे दि. ५ एप्रिल रोजी हे संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडले. दीपप्रज्वलन आणि भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष महेश बेन्दरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी डॉ. अजिंक्य देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून ते शताब्दी वर्षापर्यंतच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. एक स्वयंसेवक ते राष्ट्रचळवळ असा संघाचा प्रवास त्यांनी मांडला. अ‍ॅड. दक्षाताई मोकाशी यांनी 'पंच परिवर्तन' विषयावर मार्गदर्शन करताना समाजातील बदलाचा व्यापक विचार मांडला. इस्कॉनचे कौस्तुभ प्रभुजी यांनी आपल्या आशीर्वचनातून उपस्थितांना अनुगृहीत केले. शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र आणि हिंदू संस्कृतीचे सार श्रोत्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष मकरंद सरदेशमुख यांनी केले. संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर, संघाच्या शंभर वर्षांच्या राष्ट्रसेवेचा आढावा घेणाऱ्या 'सांस्कृतिक वार्तापत्र' विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात स्वामी समर्थ मंदिराचे सेवेकरी संजय वाघमारे, ज्ञानप्रबोधिनीच्या गायन शिक्षिका श्रुती पावगी व कुचीपुडी गुरु गायत्री आंबेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनींनी प्रबोधनगीते सादर केली, तर गायत्री आंबेकर यांच्या शिष्यांनी कुचीपुडी नृत्यातून भक्तिमय वातावरण निर्माण केले. अमोल पटवर्धन यांनी गायलेल्या 'वंदे मातरम्'ने संमेलनाचा भावपूर्ण समारोप झाला.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • हिंदू संमेलन
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.