•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 4 days ago
बातम्या  

समाज संघटितच असला पाहिजे

प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण

 

पूज्य गुरुजींची कामे धर्माच्या विश्लेषणातून चालत होती, संघाचेही कार्य तसेच आहे. समाज हा संघटितच असला पाहिजे. एकमेकांच्या सहयोगाने आपणही समर्थ व्हावे व समाजही समर्थ करावा. आपण जे काही करतो, तो धर्म आहे. तो सचोटीने, प्रामाणिकपणे जपला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

धरमपेठ महिला स्टेट को. ऑप सोसायटीच्या शिवाजीनगर स्थित  सीताराम सभागृहात मंगळवारी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे हस्ते द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर धरमपेठ महिला स्टेट को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षा निलिमा बावणे व उपाध्यक्षा सारिका पेंडसे उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प. पू. सरसंघचालकांनी पूज्य गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, गुरुजी जे बोलत असत, ते पाळत असत व जे पाळता येईल तेच बोलत असत. पूज्य गुरुजींच्या ठायी आप परभाव यांचा विलोप झाला होता. त्यांच्या आत्मीयतेचा स्पर्श केवळ स्वयंसेवकच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना झाला होता. प्रामाणिकपणा असल्यामुळे त्यांच्यात शिस्त आपसुकच होती. ते ज्याठिकाणी जायचे त्या ठिकाणच्या अनुशासनाचे पालन करायचे.

प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत धरमपेठ महिला सोसायटीच्या कार्याची प्रशंसा करताना म्हणाले की,  ‘मातृशक्तीच्या उत्थानाचे एक महान लक्षण म्हणजे ही संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालिका सर्व महिला आहेत. स्त्रीच्या स्वभावातच वात्सल्य असते, त्यामुळे ती सर्व कामे आत्मीयतेने करते. महिलांना मोकळीक दिली तर पुरुष जी कामे करतात ती सर्व कामे महिला करू शकतात.’

सारिका पेंडसे यांनी सरसंघचालकांचा परिचय करुन दिला. नीलिमा बावणे यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन अंजनी राऊत यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर सरसंघचालकांच्या हस्ते संस्थेच्या आवारत स्थापन करण्यात आलेल्या गणपतीची आरती करण्यात आली.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.