•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

शहरी माओवादी कारवायांना प्रतिबंध करणेसाठी जनसुरक्षा कायदा गरजेचा

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 10 days ago
बातम्या  

शहरी माओवादी कारवायांना प्रतिबंध करणेसाठी जनसुरक्षा कायदा गरजेचा - प्रवीण दीक्षित

पुणे;

 माओवादी चळवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या समस्येकडे राजकीय दृष्टीतून न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून गंभीरतेने बघायला हवे. शहरी माओवादी संघटनांच्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायदा गरजेचा असल्याचे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. 

 पत्रकारिता विभाग, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे आणि विवेक विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकशाही समोरील माओवाद्यांचे आव्हान व जनसुरक्षा विधेयक” या विशेष व्याख्यानाचे आयोजन (दि. ०७ ऑक्टोबर) आबासाहेब गरवारे महाविद्यातील करण्यात आले होते.


 
 प्रमुख वक्ते ॲड. प्रदीपजी गावडे यांनी त्यांच्या भाषणात, भारतातील माओवादी चळवळीचा व त्यांच्या शहरी वाटचालीचा आढावा घेतला व म्हणाले,  नक्षलवाद केवळ ग्रामीण आणि आदिवासी भागापुरता मर्यादित नसून शहरात देखील सुरवातीपासून कार्यरत आहे. देशातील माओवाद रोखण्यासाठी राज्यघटना आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक वेळी केवळ सुरक्षा यंत्रणेवर अवलंबून राहून चालणार नाही. नागरिकांनीही सजग राहून योगदान द्यायला हवे. माओवादी लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास असल्याचं भासवतात पण राज्यघटनेला मात्र विरोध करतात. देशातील सुरक्षा यंत्रणांनी शहरी भागात केलेल्या कारवाईत आतापर्यंत अनेक माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना कायद्यातील त्रुटींचा फायदा होतो व ते सुटतात त्यामुळे 'जनसुरक्षा कायदा' अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी त्यांनी श्रोत्यांना उलगडून सांगितल्या व सर्वांना कायद्याचे समर्थन आणि जागरण करण्याचे आवाहन केले.

 महाविद्यालयाचे प्राचार्य. श्री. डॉ. प्रा.विलास उगले यांनी प्रास्ताविक करताना देशाची लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी या कायद्याची आवश्यकता मांडली. 

 संविधान सरनामा वाचनाने कार्यक्रमाची सुरवात झाली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रा. डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष गोगले आभार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. अनिल खैरनार, डॉ. प्रा. राजेंद्र जमदाडे, प्रा. ज्योती कपूर, प्रा. सुधाकर अहिरे, प्रा. कुंडलिक पारधी, प्रा. अंबादास मेव्हणकर, प्रा. अनिल पारधी यांनी प्रयत्न केले.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • संविधान
  • राष्ट्रीय
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.