श्रीसमर्थवाग्देवता मंदिर, धुळें या संस्थेच्या वतीने श्री समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मीकिरामायण या ग्रंथाच्या मूळ सात खंडांचे कांडशः संपादन करून बनविण्यात आलेल्या आठ खंडाचे राष्ट्रार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या आठ खंडांमध्ये मुळ हस्तलिखितासमवेत मराठी आणि इंग्रजी अनुवाद मांडण्यात आला आहे. यावेळी सरसंघचालकांनी केलेले भाषण जसेच्या तसे.