•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

संत सेना महाराज: भक्ती आणि समतेचे प्रतीक

विश्व संवाद केंद्र - पुणे 1 day ago
राष्ट्र संत  

संत सेना महाराज: भक्ती आणि समतेचे प्रतीक 


वारकरी संप्रदायातील एक थोर संत म्हणजे संत सेना महाराज. त्यांचा जन्म १२७८ मध्ये मध्य प्रदेशातील बांधवगड येथे झाला. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळात होऊन गेलेले सेना महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी उत्तर भारतातही आपल्या भक्तीचा आणि विचारांचा प्रसार केला. त्यांचे गुरू होते संत रामानंद. आपल्या वडिलांप्रमाणेच सेना महाराज नाभिकाचा व्यवसाय करत. पण त्यांच्यातील ईश्वरभक्ती आणि दीनदुबळ्यांप्रती असलेली सेवावृत्ती विलक्षण होती. त्यांनी कोणताही मोबदला न घेता गरजूंची सेवा केली आणि मिळालेले पैसे गरिबांमध्ये वाटले. त्यांची ही निस्वार्थ वृत्ती पाहूनच संत जनाबाईंनी त्यांच्यावर अभंग लिहिला.
सेना न्हावी भक्त भला । तेणें देव भुलविला ॥१॥
 

आपल्या अभंगातून संत सेना महाराजांनी विठ्ठलाचे नामस्मरण सोपे आणि मुक्ती देणारे आहे, हे सांगितले. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका चमत्काराचा प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे. एकदा घरी साधुसंतांची सेवा करत असताना त्यांना दरबारी राजाच्या सेवेला जायला उशीर झाला. त्यामुळे संतप्त राजाने त्यांना देहदंडाची शिक्षा सुनावली. पण आपल्या भक्तासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाने सेना महाराजांचे रूप धारण करून राजाची सेवा केली. राजाला कुष्ठरोगातून मुक्ती मिळाली आणि आरशात त्याला सेनाच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन झाले. या घटनेमुळे राजाला सेना महाराजांच्या मोठेपणाची जाणीव झाली आणि त्याने त्यांचा गौरव केला.
पंढरपूरच्या वारीची तीव्र ओढ त्यांना होती. एकदा संधी मिळाल्यावर ते महाराष्ट्रातील वारकरी बांधवांसोबत पंढरपूरला आले. तेथील भक्तीमय वातावरण, संतांचा सहवास आणि पांडुरंगाचे दर्शन पाहून ते भारावून गेले. त्यांनी पंढरीचे वर्णन करताना म्हटले आहे:
जाता पंढरिस सुख वाटे जीवा || आनंदे केशवा भेटतांचि ||

संत सेना महाराजांनी केवळ अभंगच नाही, तर ओव्या, गौळण, विराण्या, पाळणा आणि भारुडे अशा विविध काव्यप्रकारात रचना केल्या. यातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्याप्रती असलेला त्यांचा आदर त्यांच्या 'आळंदी माहात्म्य' या रचनेत दिसून येतो.
संत सेना महाराजांनी आपला बराच काळ महाराष्ट्रात घालवला आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. शेवटी ते पुन्हा बांधवगडला परतले आणि तिथेच त्यांनी समाधी घेतली. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर त्यांचे समाधी मंदिर आजही भक्तांना प्रेरणा देत आहे.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • संत सेना महाराज
  • वारकरी
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.