•  11 Mar 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

गंगेचे पाणी खरंच अशुद्ध आहे? वैज्ञानिक तत्थ्ये नेमकी काय सांगतात?

विश्व संवाद केंद्र - पुणे 13 days ago
संस्कृती  

गंगेचे पाणी खरंच अशुद्ध आहे? वैज्ञानिक तत्थ्ये नेमकी काय सांगतात?


महाकुंभाला (mahakumbha) मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामूळे हिंदुत्वाचा वाढता प्रभाव समाजातील काही घटकांच्या डोळ्यात खुपतोय की काय असा प्रश्न सध्या पडत आहे? गंगा स्नानासाठी आलेल्या भाविकांना जिवाणू संसर्ग व त्वचा संक्रमणाचा धोका असल्याचे सतत लोकांना विविध माध्यमांद्वारा सांगितले जात आहे. पण यात किती तथ्य आहे? आजपर्यंत गंगाजलच्या गुणधर्मांबद्दल केलेले संशोधन या दाव्याचे खणखणीत उत्तर आहे. काय आहेत गंगाजलचे गुणधर्म आणि हिंदू धर्मात केवळ गंगाजलाला इतके पवित्र का संबोधले गेले आहे? चला, समजून घेऊया:


गंगाजल हे गंगोत्री (उत्तराखंड) येथून उगम पावणारे एक अद्वितीय गोड्या पाण्याचे परिसंस्थान आहे, जे सुमारे २५२५ किमीचा प्रवास करून अखेरीस भारतीय महासागराला मिळते. या संगमस्थळाला गंगा सागर (पश्चिम बंगाल) (ganga) म्हणून ओळखले जाते. या दरम्यान आपले पवित्र जल जवळपास संपूर्ण उत्तर आणि काही पूर्व भारताला पुरवत वाहते. भारतीयांच्या आयुष्यात गंगेचे महत्वाचे स्थान आहे. परंतु महाकुंभाच्या निमित्ताने जेव्हा जग भरातील हिंदू गंगेत स्नान करतात तेव्हा मात्र असा विचार सतत भारतीयांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला जातो की गंगेचे पाणी केवळ अशुद्धच नाही तर भारतीयांच्या प्रकृतीसाठी अयोग्य आहे. गंगाजलाच्या ‘संशयित पावित्र्याबद्दल’ संशोधक काय सांगतात पाहूया:

 

भौगोलिक संशोधनानुसार, ज्या ठिकाणी कधी काळी टेथिस महासागर अस्तित्वात होता, त्याच ठिकाणी भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या आदळण्यामुळे हिमालय पर्वत निर्माण झाले. त्यामुळे हिमालयाचा समुद्राशी असलेला संबंध सिद्ध होतो, आणि म्हणूनच हिमालयाच्या उंच शिखरांवर सापडणारे सागरी जीवाश्म या विस्मयकारक शोधाचे देखील कारण समजते. गंगानदीच्या पाण्यात विलक्षण जीवाणूनाशक गुणधर्म असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, अत्यंत प्रदूषित वातावरणातही हे पाणी उच्च प्रमाणात विरघळलेल्या प्राणवायूचे (Dissolved Oxygen) प्रमाण टिकवून ठेवू शकते. या वैशिष्ट्याचा शोध सर्वप्रथम ब्रिटिश जीवाणुतज्ज्ञ अर्नेस्ट हँकिन यांनी १८९६ मध्ये लावला. त्यांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले की सामान्य नळाच्या पाण्यात सहज विकसित होणारे कॉलरा रोगाचे जीवाणू गंगाजलाच्या संपर्कात आल्यावर अतिशय जलद गतीने नष्ट होतात.

 

या घटनेचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांनी गंगाजलाचे दोन नमुने तपासले — एक उकळून आणि दुसरा गाळून. निरीक्षणात असे आढळले की गाळलेल्या पाण्यात जीवाणूनाशक गुणधर्म कायम होते, तर उकळलेल्या पाण्यात ते नष्ट झाले. यावरून हे देखील स्पष्ट झाले की, गंगाजलातील हा जीवाणूनाशक घटक उष्णतेमुळे नष्ट होणारा आहे.

सुमारे दोन दशकांनंतर, १९१६ मध्ये कॅनेडियन सूक्ष्मजैवशास्त्रज्ञ फेलिक्स डी'हेरले यांनी पॅरिसमधील इन्स्टिट्यूट पास्तूर येथे संशोधन करत असताना फेजेस (Phages) या सूक्ष्मजीवांची संरचना शोधून काढली आणि स्पष्ट केली. हे फेजेस प्रथिनांनी बनलेल्या बाह्य आवरणाने वेढलेले असतात आणि त्यामध्ये अनुवांशिक सामग्री असते. विशेष म्हणजे, त्यांचाही उष्णतेमुळे नष्ट होण्याचा गुणधर्म आहे, जो हँकिन यांच्या शोधांशी पूर्णपणे जुळणारा आहे.

गंगाजलाची ही स्वतःला शुद्ध ठेवण्याची आणि स्वतःच पुनरुत्पन्न करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता पाश्चिमात्य जगासाठी विस्मयकारक होती.

Impact of mass ritualistic bathing on the level of trace elements in Ganga water

गंगेच्या या पवित्र्यामुळेच कोणतेही हिंदू धार्मिक विधी गंगाजलाशिवाय पूर्ण होत नाहीत. अर्थात या निमित्ताने हे देखील सिद्ध होते की भारतीय ऋषींचा गंगाजलाबद्दल किती सखोल आभास असेल. ही माहिती घेतल्या नंतर जेव्हा वेदांमधील गंगेचे वर्णन आणि सनातन धर्मात असलेले गंगेचे महत्व यांचा संदर्भ लावतो तेव्हा खऱ्या अर्थाने ‘गंगेत स्वर्ग’ असल्याचे लक्षात येते.

 

संदर्भ 

१) Ganga Water Is Still Pure Even After 57 Crore Devotees Take Bath | 57 कोटी भाविकांनी स्नान केल्यानंतरही गंगेचे पाणी शुद्ध: पद्मश्री शास्त्रज्ञाने 5 घाटांवरील नमुने घेतले, म्हणाले- हे क्षारयुक्त पाण्याइतके शुद्ध | Divya Marathi

२) Study reveals Ganga's self-purifying ability amid CPCB water quality concerns at Maha Kumbh


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • गंगा
  • कुंभमेळा
  • पाणी शुद्ध
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (36), संस्कृती (34), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.