•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांचे भयावह वास्तव आणि आपण

ॲड. आशिष सोनवणे 15 days ago
भाष्य  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

चिन्मय प्रभु दास यांची बेकायदेशीर अटक: बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांचे भयावह वास्तव आणि आपण

इस्कॉन बांग्लादेशच्या श्री चिन्मय प्रभू हे बांग्लादेशच्या  शेख हसिना यांचे शासन उलथवून, प्रस्थापित करण्यात आलेल्या अराजक अश्या मोहंमद युनूस यांच्या धर्मांध शासनकाळात तेथील हिंदू समाजावर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा विरोध करून हिंदूंना संघटित आणि सक्षम करणाऱ्या चळवळीचे उर्धायु आहेत. श्री. चिन्मय प्रभू दासांना तेथील धर्मांध शासनाने बेकायदेशीरपणे अटक केली आहे आणि न्यायालयात त्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांची देखील हत्या करण्यात आली आहे. तसेच, तेथे पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या विरुद्ध हिंसाचार उफाळून आला आहे अश्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येत आहेत.

बांगलादेशातील हिंदूंची भयावह स्थिती आणि तेथे ठरवून सुरू असणाऱ्या नरसंहाराचे दाहक स्वरूप भीषण आहे — तेथे मंदिरे पाडली जाताये, घरे उद्ध्वस्त केली जाताय, महिलांवर अनन्वित अत्याचार केले जाताय, आणि हिंसक जमाव रस्त्यावर उतरून निरपराधांचे प्राण घेताय अशी परिस्थिती आहे.

हिंदूंच्या मानवाधिकरांचे असे निर्दयपणे उल्लंघन होत असताना एकूणच आंतरराष्ट्रीय समुदाय यावर मौन पाळून आहे. हीच शांतता या मानवतेच्या हत्याऱ्यांना प्रोत्साहन देते आहे. बहुतांश भारतीयांना देखील याविषयी एक तर माहिती नाही किंवा ते उदासीन आहेत. 

आत्ता वेळ आली आहे की जगभरातील सामान्य नागरीक,  मानवाधिकार संघटना आणि सरकारांनी संवैधनिक मार्गांनी आपापल्या परीने आवाज उठवून बंग्लादेशात होणाऱ्या या अमानवीय मानवाधिकार उल्लंघनाच्या आणि हिंदू वांशनाशाच्या घटनांसाठी तेथील सरकारास जबाबदार धरिले पाहिजे आणि त्यांना या घटना रोखण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. अन्यथा तेथील अत्याचारांना आपली देखील मुक संमती आहे असेच गृहीत धरले जाईल. 

(c) ॲड. आशिष सोनवणे


- ॲड. आशिष सोनवणे

  • बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांचे भयावह वास्तव आणि आपण
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

ॲड. आशिष सोनवणे

ॲड. आशिष सोनवणे

 सामाजिक (1), हिंदुत्व (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.