•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

धर्मपरायण अहिल्यादेवी

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 17 days ago
बातम्या  

हे कर्मयोगिनी राजयोगिनी जयतु अहिल्यामाता ।
युगों युगों तक अमर रहेगी यशकीर्ति की गाथा ।
जय जयतु अहिल्यामाता । जय जयतु अहिल्यामाता ॥
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याचा जागर ...          
    

 

धर्मपरायण अहिल्यादेवी 
अहिल्यादेवींचे जीवन हे धर्मपरायण होते. “ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे, ते पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. प्रजेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे” हे त्यांच्या राजनीतीचे सूत्र होते. त्यांच्या जीवनातील त्याग आणि सेवा ही ईश्वर  समर्पित होती. अहिल्यादेवींच्या पत्राची सुरुवात “श्री शंकर आज्ञेवरून” या मायन्याने होत असे. श्री महादेवाच्या आज्ञेवरून हे पत्र पाठवत असल्याचा भाव त्यांच्या हृदयात जागृत होता. पत्राच्या शेवटी अहिल्यादेवी स्वतःचे नाव अथवा सही करत नव्हत्या. फक्त ‘श्रीशंकर’ एवढेच लिहित होत्या. महादेवाच्या नंदीला होळकरांच्या राजचिन्हाच्या उजव्या बाजूला स्थान होते. आपले राज्य शिवार्पण करून भगवान शिवाच्या साक्षीने राज्य चालवावे याच उदात्त हेतूने त्यांनी आपल्या हातात शिवपिंड धारण केले होते. मूळात हिंदवी स्वराज्याचे अधिष्ठान हे ईश्वरीच होते.
पंढरपूरच्या विठोबावर त्यांची श्रद्धा होती. अहिल्यादेवींनी रखुमाईच्या मूर्तीसाठी दागिने पाठवले होते. खंडेराव होळकर यांनीही विठोबाच्या नैवेद्यासाठी वार्षिक तरतूद केली होती. अहिल्यादेवी राजघराण्यातील असल्या तरी त्यांचा पिंड हा धार्मिक व आध्यात्मिक होता. त्या म्हणत “स्नानाने शरीरशुद्धी आणि ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते” मराठी कवयित्री शांता शेळके यांनी त्यांच्या ‘सती अहिल्या’ या कवितेत अहिल्यादेवींची धर्मपरायणता, सात्विक वृत्ती आणि निर्मळ चारित्र्याचा गौरव केला आहे. या कवितेत शांता शेळके लिहितात -
        होते नव्हते सर्व अर्पिले जनकल्याणासाठी । 
        अजून कोटिलिंगार्चन चाले नित्य नर्मदेकाठी ॥ 
        शिवनिर्माल्यापरी सतीने विभव मानिले सारे ।
        गुण गौरव साध्वीचा गाती आजहि तिथले वारे ॥
        राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी ।
        अजूनी नर्मदाजळी लहरती तिच्या यशाची गाणी ॥


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • अहिल्याबाई
  • सुराज्य
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.