वैशाली काळे गलांडे
24 days ago

मराठी भाषा संवर्धन काळाची गरज
२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे.यानिमित्त मराठी भाषेचे वास्तव समजून घेऊन तिचे संवर्धन करणे, हे मराठी भाषिक म्हणून आपले कर्तव्य आहे.
सध्याचे यांत्रिक युग ऐहिक सुखास प्राधान्य देणारे आहे. जागतिकीकरणाच्या झंझावातात आधीच इंग्रजाळलेल्या आपल्या संस्कृतीस पश्चिमी विचार प्रभावी वाटू लागले आहेत.इंग्रजी भाषेचा अत्यंत प्रभावी पगडा जनमानसावर पडला आहे . लहान लहान गावातून सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. त्यातच सीबीएससी शाळांचे अक्षरशः पेव फुटले आहे. मराठी भाषाच त्यांच्याच अभ्यासक्रमातून बाहेर पडत आहे. त्यामुळे मराठी भाषेचे भवितव्य अंधारात आहे . महाराष्ट्रीयन मुलांना मराठी भाषा नीट लिहिता वाचता येत नाही अशा प्रकारचा नकारात्मक सूर सध्या समाजात पसरला आहे . येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे. ही मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी आहे.
जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी मराठी भाषा बोलली पाहिजे . जेथे जेथे दोन व्यक्तींना मराठी येते तेथे तेथे बोलण्याची माध्यम भाषा मराठीतच असली पाहिजे. जास्तीत जास्त आपण मराठीतून बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मराठीतील बोलीभाषा भरपूर आहेत. बोलीभाषा कोकणी, अहिराणी ,विदर्भी अशा आहेत. त्यांच्यामध्ये साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मातृ भाषेतून शिक्षण हा महत्त्वाचा टप्पा आहे.
भाषेत लवचिकता आणणे आवश्यक. व्यावहारिक कामे करताना इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत समाविष्ट केले पाहिजेत. विविध विषयावरील साहित्य मराठी भाषेत आणले पाहिजे. मराठी ज्ञानकोश ,शब्दकोश ,परिभाषा कोश समृद्ध केला पाहिजे.
भाषांतरित साहित्य हे ललित साहित्यापुरते मर्यादित न राहता व्यवस्थापन ,विज्ञान ,समाजशास्त्र अशा विविध अंगाने समृद्ध झाले पाहिजे .त्यासाठी आपण मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत.
जागतिक स्तरावर मराठीचा प्रभाव पाडण्यासाठी उच्च दर्जाच्या अफाट वाचनाची गरज असून उत्तमोत्तम साहित्य मराठीतून आणले पाहिजे . उत्साहवर्धक वाङमयीन वातावरण निर्माण केले पाहिजे.
गीताग्रजा
(डॉ वैशाली काळे-गलांडे)
- वैशाली काळे गलांडे
Share With Friends
अभिप्राय
अभिप्राय लिहा