•  23 May 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

‘धर्मनिरपेक्षता’च्या नावावर हिंदूंची शिकार करणार्‍या दहशतवाद्यांचा 'सन्मान'!

विश्व संवाद केंद्र - पुणे 29 days ago
भाष्य  

‘धर्मनिरपेक्षता’च्या नावावर हिंदूंची शिकार करणार्‍या दहशतवाद्यांचा 'सन्मान'!


धर्मनिरपेक्षता दाखविण्यासाठी पुरोगाम्यांनी हिंदूंच्या हत्येची क्रुर चेष्टा केली आहे. 

 

जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ बेसरन व्हॅली २२ एप्रिल २०२५ रोजी निःशस्त्र हिंदू पर्यटकांवर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला. मुस्लिम दहशतवाद्यांनी २६ निष्पाप हिंदू नागरिकांना केवळ त्यांच्या धर्माच्या ओळखीमुळे गोळ्या घालून ठार मारलं. चूक काय होती त्यांची? फक्त हिंदू असणं.

ओळखपत्र तपासून, नावं पाहून, काहींची शारीरिक तपासणी करून — जणू काही 'जिहादी चाचणी' घेऊन — मग क्रूर हत्या केल्या. डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेच्या साक्षीदारांनी स्पष्टपणे सांगितले की हल्ल्याचा उद्देश ‘धर्मावर आधारित निवड करून’ हिंदूंना लक्ष्य करणं हाच होता.

या घडलेल्या भीषण आतंकी हल्ल्याने देशाच्या हृदयाला हादरवून सोडले आहे. परंतु नेहमीप्रमाणे भारतीय लिबरल मंडळी, बुद्धिजीवी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, जे इस्लामी हिंसेचं वारंवार समर्थन करत आले आहेत या हत्याकांडामागचं इस्लामी प्रेरणांवरून लक्ष हटवण्यासाठी ‘Terrorism has no religion’ हा साफ गुळगुळीत झालेले वाक्य पुन्हा उगाळायला सुरुवात केली.

ही तीच वेळ आहे हे ओळखण्याची – शत्रू सीमारेषेवर नाही, तर आपल्या घरातच आहे.

 


भारतामध्ये अनेक वेळा इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ले घडवले आहेत, ज्यामुळे देशभरात रक्ताच्या थेंबांची एक शोकांतिका रेखाटली गेली आहे. कधी २००८ मधला २६/११चा मुंबई हल्ला, तर कधी १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट, किंवा काश्मीरमधील हिंदूविरोधी दहशतवादाचा इतिहास, या सर्वाने देशाच्या मनावर आपला ठसा सोडला आहे. या हल्ल्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते – हिंदू समाजाला उच्छेदित करणं. मात्र, प्रत्येक हल्ल्यानंतर, देशातील काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी विविध प्रकारे या दहशतवाद्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. कधी 'मानवतावादा'चा दृष्टिकोन पुढे करत या हिंसाचाराचे समर्थन केले गेले, तर कधी 'धर्मनिरपेक्षते'च्या नावाखाली या अत्याचारांकडे दुर्लक्ष केले गेले. 'दहशतवादाला धर्म नसतो' असे वारंवार सांगण्यात आले. १९९३ ला तर हिंदूंवरतीच फक्त हल्ले झाले आहेत, हे लपवण्यासाठी एक खोट्या ब्लास्ट ची बातमी सुद्धा शरद पवार यांनी सांगितली. होती.

१९९० च्या दशकात सुरू झालेल्या अत्याचारांच्या मालिकेने संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील हिंदूंच्या जीवनावर काळोख्या सावल्या टाकल्या. त्या इस्लामी हल्ल्यांचं मूळ उद्दिष्ट फक्त आणि फक्त हिंदूंना संपवणं हेच आहे.आणि आता पहलगाम हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. यात कुठलीही दडपणाची गरज नाही – इस्लामी दहशतवादाचं मूळ लक्ष्य हिंदू समाज आहे. दहशतवादी ID कार्ड पाहून गोळ्या झाडतो, नाव ऐकून ट्रिगर दाबतो — पण तरीही, तथाकथित 'धर्मनिरपेक्ष' मंडळी याच वेळी ट्विटरवर 'दहशतवादाला धर्म नसतो' असे मंत्र पेरायला सुरूवात करतात!

हल्लेखोरांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवणारे हे महाभाग धन्य आहेत! पहलगाममध्ये रक्ताचे लोट वाहत असताना, यांना त्यातही राजकारण करण्याची खुमखुमी येते. खरं तर हे 'सेक्युलर' लोक दहशतवाद्यांचे अप्रत्यक्ष संरक्षक बनले आहेत — कारण ते त्यांच्या धर्माधारित हिंसेचं समर्थन करत, वारंवार सामान्य मुस्लीम समाजाचं संरक्षण करण्याच्या नावाखाली जिहादी मानसिकतेला मोकळं रान देतात. दहशतवाद्यांचं खरं उद्दिष्ट जेव्हा धर्मावर आधारित असतं, तेव्हा त्याला "धर्म नाही" असं म्हणणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्याचं गळचट खून आहे.

काहींनी तर त्या नरसंहारावर अक्षरशः जल्लोष केला! यांना देशाचं काय घेणं देणं? फक्त आपली मतपेटी सुरक्षित राहिली पाहिजे! हेच ते लोक,घराचे भेदी, सडलेली टोमॅटं, आणि थेट शब्दात सांगायचं तर – देशद्रोही. देशासाठी उभं राहायचं सोडून हेच लोक दहशतवाद्यांना क्लीन चिट देतात आणि *"इस्लामोफोबिया"*च्या नावाने ढोंगी नैतिकता पाजळतात
     
हे तर झाले बुद्धिजीवी, विचारवंत आणि इन्फ्लुएन्सर्स चे परंतु त्याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे लोकप्रतिनिधी, जे स्वाभाविकपणे जनतेचे रक्षक असे म्हणवतात ते देखील दहशतवाद्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत

“जर दहशतवाद्यांनी ओळख पाहून गोळ्या झाडल्या, तर त्यांना तसं वाटण्यामागे सरकारच्या हिंदुत्व धोरणांचा दोष आहे…” — हे विधान कोणी यांना दिलंय असं वाटतं? काही अतिरेकी संघटनेचा प्रवक्ता? नाही. हे उद्गार आहेत काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांचे पती, रॉबर्ट वड्रा यांचे — जे सध्या स्वतः अनेक जमीन घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहेत. ह्याला म्हणतात दहशतवाद्यांच्या हेतूंचं समर्थन करताना सरकारला दोष देणं. म्हणजे, ज्या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना "कलमा" म्हणायला लावून ओळख पटवून गोळ्या झाडल्या, त्यांच्या हत्येचं कारण वड्रा यांच्या मते सरकारचं हिंदुत्व धोरण!

म्हणजे तुम्ही हत्यार चालवाल, पण दोष सरकारचा?हे विधान म्हणजे दहशतवाद्यांचा अजेंडा ओढून सरकारवर टाकण्याचा भोंगळ प्रयत्न आहे. हिंदूंना टार्गेट केलं, कारण ते हिंदू होते — हे वास्तव वड्रांना अस्वस्थ करतं, म्हणून ते हल्लेखोरांच्या हेतूंना बौद्धिक मांडणी देतात.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पहलगाममधील इस्लामी दहशतवादी हल्ल्याला केवळ एक “फायरिंग इन्सिडेंट” म्हणजेच ‘गोळीबाराची साधी घटना’ म्हणून संबोधून त्या हल्ल्याचं गांभीर्यच नाकारलं. जिथे निर्दोष हिंदूंना केवळ त्यांच्या धर्माच्या ओळखीवरून लक्ष्य केलं गेलं, अशा भीषण जिहादी हल्ल्यावर असा सौम्य शब्दप्रयोग म्हणजे केवळ असंवेदनशीलता नाही, तर देशहिताच्या आणि पीडितांच्या भावनांचाही अवमान आहे.

हा प्रकार 'माझा देश माझं कुटुंब' असं म्हणणाऱ्या नेत्यांकडून अपेक्षित होता का? की त्यांचं 'कुटुंब' कुठलं वेगळंच आहे, ज्यात देशाच्या सुरक्षेच्या ऐवजी ‘मत बँकेचं’ गणित जपणं महत्त्वाचं वाटतं? मल्लिकार्जुन खडगेनी तर त्यावर बोलणेच टाळले. त्यांची टिप्पणी म्हणजे केवळ सत्यावर पडदा घालण्याचा एक दुसरा मार्ग आहे. एका नृशंस दहशतवादी हल्ल्याचे ज्या ठामपणे धर्मावर आधारित कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे, त्यावर "सर्व पक्षांच्या बैठकीत चर्चा" हा एक प्रकारची पळवाट नाही का? 

डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह अझाद पार्टीचे नेते सलमान निज़ामी यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूचा संदर्भ देत संपूर्ण इस्लामी दहशतवादावरच पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. सलमान निज़ामींसारखे लोक "तुरळक अपवाद" पुढे करून, मुख्य प्रवाहातल्या जिहादी मानसिकतेचा हिंसक आणि धार्मिक हेतू असलेला चेहरा झाकू पाहतात.

हे लोकप्रतिनिधी आहेत की दहशतवाद्यांचे वकील? जनतेने यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? जेव्हा देश संकटात असतो, तेव्हा यांनी एकदिलाने उभे राहायला हवे, सरकारला पाठिंबा द्यायला हवा. पण हे तर उलट दहशतवाद्यांचे समर्थन करून, त्यांच्या कृत्यांना पाठीशी घालून, जनतेच्या जखमांवर मीठ चोळत आहेत. जनतेच्या सुरक्षेची, त्यांच्या जीविताची यांना काहीच किंमत नाही का?खरतर याना राजकीय स्वार्थ, मतांची गणिते यांच्यापुढे यांना देशाची सुरक्षा, लोकांचे प्राण काहीच महत्त्वाचे वाटत नाहीत.

जेव्हा इस्लामो-लेफ्टिस्ट आपला अजेंडा साधून इस्लामी दहशतवादाचं बचाव करतात आणि जिहादला "धर्म नाही" म्हणून पांघरूण घालतात, तेव्हा हिंदूंना आणि इतर सर्व अल्पसंख्यांक समुदायांना हे समजून घ्यायला हवं की दहशतवाद हा कश्मीरापुरताच मर्यादित नाही. दहशतवाद हा एक जागतिक समस्या आहे ज्यात एका धर्मानेच आपले कार्य केले आहे. पाहीलगाम हल्ला आणि इतर अशा घटनांमधून हे स्पष्ट आहे की हे हल्ले हिंदूंवर आणि त्यांच्याच धर्मावर आधारित होते.

ही वेळ जागे होऊन घरातील लागलेल्या वाळवाला ओळखून, त्या वर आवश्यक ती कारवाई करून, तिला घरातून हाकलून लावण्याची वेळ आली आहे


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • काश्मिर
  • हिंदू
  • पहलगाम हल्ला
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (34), सामाजिक (72), माध्यमे (15), रा. स्व. संघ आणि परिवार (23), संस्कृती (22), जनजाती (7), महिला (9), उद्योग (2), शिक्षण (9), विज्ञान (4), हिंदुत्व (20), कम्युनिझम (2), राष्ट्रीय संरक्षण (9), इस्लाम (8), कला (2), राजकारण (5), सेवा (8), साहित्य (2), कृषी (1), पर्यावरण (4), क्रीडा (2), ख्रिस्ती पंथ (2),

दिनविशेष

trending

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !!

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !! - देवर्षी नारद हे...
विद्याधर ताठे 10 दिवसांपूर्वी

 दिन विशेष
Read more

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.